ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन.


सांगली - आधुनिक काळातील झाशीची राणी ज्यांच्या शब्दांत अंगार असे ,भारतीय /हिंदुस्तानच्या संस्कृतीचा आदर्शआशा जेष्ठ  सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे मंगळवारी सकाळी ११.४५ वाजतासोलापूर ला अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या . महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या ६५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.
मुलाचे शिक्षणपूर्ण होईपर्यंत त्यांनी फक्त घर सांभाळले. मुलगा स्वावलंबी होताच १९९६ मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचे वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरविले. यानंतर अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडविण्याच्या कामास त्यांनी सुरुवात केली. यामुळे नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. २००१ पासून त्या सामाजिक कार्यात होत्या. २००८ पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्‍या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक व्याख्याने दिली. तुटणारी घरे वाचली पाहिजेत या भावनेने त्या कार्य करत होत्या.
महिन्यातून २६ ते २८ दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्‍या अपर्णा रामतीर्थकर या सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली. अपर्णाताई या हिंदुस्थानी महिलांचा अंगार होता, अखेर त्यांना काळाने बोलावून घेतले देवाला सुद्धा चांगली माणसेच आवडतात असो..